काँग्रेसमुळेच आहे महाराष्ट्र सरकार! अशोक चव्हाणांपाठोपाठ बाळासाहेब थोरात यांचंही मोठं वक्तव्य

मुंबई तक

महाराष्ट्रात 2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. उद्धव ठाकरे हे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. हे सरकार अंतर्विरोधाने पडेल हे म्हणणाऱ्या भाजपलाही काही बोलण्यासाठी उरलं नाही. कारण या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनीही हे वक्तव्य केलं की आता हे सरकार पडेल असं वाटत नाही. अशात काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी केलेली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात 2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. उद्धव ठाकरे हे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. हे सरकार अंतर्विरोधाने पडेल हे म्हणणाऱ्या भाजपलाही काही बोलण्यासाठी उरलं नाही. कारण या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनीही हे वक्तव्य केलं की आता हे सरकार पडेल असं वाटत नाही. अशात काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी केलेली वक्तव्य ही चर्चेचा विषय ठरत आहेत, सगळ्यांच्या भुवया उंचावणारी ठरत आहेत.

‘महाविकास आघाडी’ स्थापनेचा निर्णय कधी अन् कसा झाला?; शरद पवारांनी उलगडलं गुपित

अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी ठाकरे सरकारला म्हणजेच शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला थेट इशाराच देऊन टाकला आहे. अशोक चव्हाण यांनी मंठा या ठिकाणी असलेल्या सभेत बोलताना असं म्हटलं आहे की काँग्रेसमुळेच सरकार आहे.

नितीन गडकरी चुकीच्या पक्षातला चांगला माणूस – अशोक चव्हाण

हे वाचलं का?

    follow whatsapp