गुढीपाडव्याला महाराष्ट्र निर्बंधमुक्त होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

कोरोनाची साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. तसंच कोरोनाचे निर्बंधही मोठ्या प्रमाणावर शिथील करण्यात आले आहेत. अशात चर्चा सुरू झाली ती राज्य निर्बंधमुक्त होणार का? याची. गुढीपाडव्याला राज्य निर्बंधमुक्त होईल असंही सांगितलं जातं. या सगळ्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात मास्कमुक्ती होणार का? राजेश टोपे यांनी दिलं अत्यंत महत्त्वाचं उत्तर म्हणाले… […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाची साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. तसंच कोरोनाचे निर्बंधही मोठ्या प्रमाणावर शिथील करण्यात आले आहेत. अशात चर्चा सुरू झाली ती राज्य निर्बंधमुक्त होणार का? याची. गुढीपाडव्याला राज्य निर्बंधमुक्त होईल असंही सांगितलं जातं. या सगळ्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात मास्कमुक्ती होणार का? राजेश टोपे यांनी दिलं अत्यंत महत्त्वाचं उत्तर म्हणाले…

काय म्हणाले आहेत अजित पवार?

आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतर रात्रीपर्यंत गुढीपाडव्याच्या संदर्भातली नियमावली खासकरून शोभायात्रांना संमती दिली जाणार की नाही ते स्पष्ट होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच याबद्दलचा निर्णय घेतील. आज दुपारी चार वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सगळ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp