नाशिक : कथित Love Jihad विवाह सोहळ्याला राजकीय वळण, बच्चू कडूंनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

मुंबई तक

नाशिकमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला आता राजकीय वळण लागलेलं आहे. १८ तारखेला नाशिकमधील प्रसाद आडगावकर यांच्या २८ वर्षीय दिव्यांग मुलीचा विवाहसोहळा एका मुस्लीम युवकाशी ठरवण्यात आला होता. या विवाहाची आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यात हस्तक्षेप करत हा सोहळा रद्द करण्यास भाग पाडलं. यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

नाशिकमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला आता राजकीय वळण लागलेलं आहे. १८ तारखेला नाशिकमधील प्रसाद आडगावकर यांच्या २८ वर्षीय दिव्यांग मुलीचा विवाहसोहळा एका मुस्लीम युवकाशी ठरवण्यात आला होता. या विवाहाची आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यात हस्तक्षेप करत हा सोहळा रद्द करण्यास भाग पाडलं. यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी आडगावकर कुटुंबाची भेट घेत त्यांना पाठींबा दिला आहे.

बच्चू कडू यांनी आडगावकर कुटुंबाशी भेट घेऊन कोणालाही न घाबरता मुलीचं लग्न लावा असा विश्वास दिला आहे. हे लग्न लव्ह जिहादचं प्रकरण नाही, त्यामुळे तुम्हाला काही अडचण आली तर मी तुमच्यासोबत उभा असेन अशा शब्दांत बच्चू कडूंनी मुलीचे वडील प्रसाद आडगावकर यांना धीर दिला आहे.

काय आहे हे प्रकरण?

नाशिक येथे राहणाऱ्या प्रसाद आडगावकर यांची २८ वर्षीय दिव्यांग मुलीचा विवाह तिच्यासोबतच शिकणाऱ्या मुस्लीम तरुणाशी ठरला होता. दोन्ही परिवाराची या विवाह सोहळ्याला परवानगी होती. तसेच या प्रकरणात कोणताही धर्म परिवर्तनाचा दबाव नव्हता. दोघेही परिवार लग्नासाठी तयार असल्यामुळे १८ तारखेला हा विवाह सोहळा ठरवण्यात आला.

हे वाचलं का?