Raj Thackeray : मनसेमुळे आगामी काळात निवडणुकांमध्ये प्रस्थापित पक्षांना धक्के बसतील!

मुंबई तक

दीपक सुर्यवंशी : कोल्हापूर : आगामी निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढविणार आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना यात चांगलेच धक्के बसतील, असा दावा पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. ते आज कोल्हापूरमध्ये सर्किट हाऊस इथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी इतरही मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरे सध्या कोल्हापूर आणि कोकणच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे पाच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दीपक सुर्यवंशी :

कोल्हापूर : आगामी निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढविणार आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना यात चांगलेच धक्के बसतील, असा दावा पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. ते आज कोल्हापूरमध्ये सर्किट हाऊस इथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी इतरही मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरे सध्या कोल्हापूर आणि कोकणच्या दौऱ्यावर आहेत.

राज ठाकरे पाच वर्षांनंतर कोल्हापूरमध्ये :

तब्बल 5 वर्षांच्या कालखंडानंतर राज ठाकरे आज कोल्हापूरमध्ये दाखल झाले. त्यावेळी तावडे हॉटेल परिसरात त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरे काय म्हणाले?

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आजपर्यंतच्या आपला राजकीय अनुभव पाहता मनसेमुळे प्रत्येक निवडणुकीत प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व पक्षांना हादरे बसले आहेत. यावेळीसुद्धा याच घटनेची पुनरावृत्ती होईल, असं वाटतं. मुंबई महापालिकेची निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp