‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राष्ट्रवादी-मनसे भिडले : ठाण्याच्या मॉलमध्ये तुफान राडा

मुंबई तक

ठाणे : येथील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरुन राष्ट्रवादी विरुद्ध मनसे आमने-सामने आलेले पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात जाऊन रात्री दहा वाजताचा शो बंद पाडला. तर त्याचवेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी शो पुन्हा सुरु करण्याचा आग्रह धरला. या दरम्यान, चित्रपटगृहात जोरदार राडा झाला. या राड्यात प्रेक्षकांनी पैसे परत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ठाणे : येथील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरुन राष्ट्रवादी विरुद्ध मनसे आमने-सामने आलेले पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात जाऊन रात्री दहा वाजताचा शो बंद पाडला. तर त्याचवेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी शो पुन्हा सुरु करण्याचा आग्रह धरला. या दरम्यान, चित्रपटगृहात जोरदार राडा झाला. या राड्यात प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन एका प्रेक्षकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याची माहिती आहे.

या राड्यानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम आणि विकृत करण्याची जी पुरंदरेंची परंपरा आहे, ती आता चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात पोहचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ही पद्धत महाराष्ट्रात आणली आहे. पण असे विकृत चित्रपट महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.

तर आव्हाड यांनी शो बंद पाडताच काही वेळात मनसेचे नेते अविनाश जाधव तिथं पोहचले, अन् त्यांनी बंद पडलेला चित्रपटाचा शो पुन्हा सुरु केला. तसंच एखाद्याला मारहाण करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल आव्हाड यांना विचारला. ते म्हणाले, तुम्ही मंत्री होता ना काही दिवसांपूर्वी? तुम्ही संविधान मानणारे आहात ना? मग मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? तसंच जर दम असेल समोरा-समोर या. हे रात्री १० च्या शोमध्ये यायचं आणि पब्लिकला मारायचं ही कोणती पद्धत?

संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले होते?

खासदार संभाजीराजे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वेडात मराठे वीर दौडले सात आणि हर हर महादेव या चित्रपटांवरून संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे त्यावर कुणी सिनेमा करणार असेल तर ती कौतुकाचीच बाब म्हटली पाहिजे. राजस्थानचे महाराणा प्रताप घराणं सोडलं तर अनेक ऐतिहासिक सिनेमा आले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp