Nitin Gadkari letter To Uddhav Thackeray : शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना आवरा! गडकरींनी दिला इशारा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राने राज्याच्या राजकारणात शनिवारी खळबळ उडाली. नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून (खासदार, आमदार व अन्य) रस्त्यांच्या कामात अडथळा आणला जात असून, कामं करणाऱ्या कंत्राटदारांना त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढेल, अशी चिंताही गडकरींनी […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राने राज्याच्या राजकारणात शनिवारी खळबळ उडाली. नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून (खासदार, आमदार व अन्य) रस्त्यांच्या कामात अडथळा आणला जात असून, कामं करणाऱ्या कंत्राटदारांना त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढेल, अशी चिंताही गडकरींनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं २५ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांना (Nitin Gadkari letter to Uddhav thackeray) पाठवलेलं पत्र समोर आलं आहे. या पत्रातून नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या काही खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींबद्दल तक्रार केली आहे. राज्यात सुरू असलेल्या काही महामार्गाच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आडकाठी टाकत असल्याचा गंभीर आरोप गडकरींनी केला आहे.
नितीन गडकरी त्या पत्रात काय म्हणाले?
केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून, काही प्रगतीपथावर आहेत. मात्र, अनेक प्रकल्पांच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचं माझ्या निर्दशनास आलेलं आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषतः वाशिम जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडत आहे’, असं गडकरींनी पत्राच्या सुरुवातीला म्हटलं आहे.