NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी होणार का? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात…

मुंबई तक

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर आजचा दिवस दोन बातम्यांनी गाजला पहिली बातमी होती आर्यन खानला भेटायला शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात जाऊन आला ती. दुसरी बातमी होती ती नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांची. समीर वानखेडे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आज नवाब मलिक यांनी काही गंभीर आरोप केले. अर्थात हे आरोप समीर वानखेडेंनी फेटाळून लावले. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

आजचा दिवस दोन बातम्यांनी गाजला पहिली बातमी होती आर्यन खानला भेटायला शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात जाऊन आला ती. दुसरी बातमी होती ती नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांची. समीर वानखेडे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आज नवाब मलिक यांनी काही गंभीर आरोप केले. अर्थात हे आरोप समीर वानखेडेंनी फेटाळून लावले. मात्र त्यांचं मावळ येथील एक भाषणही समोर आलं. ज्यामध्ये समीर वानखेडेंना तुरुंगात टाकणार असा इशाराच त्यांनी दिला.

आता या सगळ्याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘समीर वानखेडे यांची चौकशी करण्याचा काही प्रश्नच येत नाही. ते ज्या खात्यासाठी काम करत आहेत ते केंद्राच्या अखत्यारीत येतं. नवाब मलिक हे त्यांच्याबाबत नेमकं काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. तसंच नवाब मलिक यांनी कोणतेही पुरावे माझ्याकडे दिलेले नाहीत. मी त्यांच्याकडून माहिती घेईन. सध्या माझ्याकडे काही माहिती नाही. मात्र समीर वानखेडेंची चौकशी करण्याचा प्रश्न नाही.’

काय आरोप केले होते नवाब मलिक यांनी?

हे वाचलं का?

    follow whatsapp