पंतप्रधान मोदींचं ठाकरे सरकारवर शरसंधान! मलिकांच्या बचावावरून साधला निशाणा?

मुंबई तक

गेल्या काही आठवड्यांपासून केंद्रीय संस्थांच्या कारवायांवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालयालाच पत्र दिलेलं आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या राजीनाम्याची मागणी होतं आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावत, मलिकांना मुस्लीम असल्यानं टार्गेट केलं जातं असल्याचं पवार म्हणाले होते. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गेल्या काही आठवड्यांपासून केंद्रीय संस्थांच्या कारवायांवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालयालाच पत्र दिलेलं आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या राजीनाम्याची मागणी होतं आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावत, मलिकांना मुस्लीम असल्यानं टार्गेट केलं जातं असल्याचं पवार म्हणाले होते. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी नामोल्लेख टाळत निशाणा साधला आहे.

पाच राज्यातील विजयानंतर संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय संस्थाबद्दल होत असलेल्या चर्चेबद्दल भाष्य केलं. त्याचबरोबर भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर धर्माशी जोडलं जात असून, अशा भ्रष्टाचाऱ्यांना धर्म, जातीपासून दूर करण्याचं आवाहन केलं.

काय म्हणाले मोदी?

“आजच्या प्रसंगी मी देशासमोर माझ्या काही चिंता मांडू इच्छितो. देशातील नागरिक मोठ्या जबाबदारीने देशहितासाठी काम करत आहे. राष्ट्रनिर्माणात लोक लागले आहेत. मात्र काही लोक वारंवार खालच्या स्तरावरील राजकारण करत आहेत. कोरोना काळात राजकारण केलं गेलं”, असं मोदी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp