Ramdas Athawale: ठाकरेंसोबत आंबेडकरांची युती, आठवलेंची झाली पंचाईत?

मुंबई तक

Ramdas Athawale in political trouble: मुंबई: भारतीय रिपब्लिकन पक्ष (RPI) चे अध्यक्ष रामदास आठवलेंना (Ramdas Athawale) घेऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला होता. पुढे आठवले भाजपसोबत (BJP) गेले आणि केंद्रात त्याना मंत्रिपद देण्यात आलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) जोगेंद्र कवाडेंसोबत युती करुन रिपब्लिकन पार्टीच्या कवाडे गटाशी हात मिळवणी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Ramdas Athawale in political trouble: मुंबई: भारतीय रिपब्लिकन पक्ष (RPI) चे अध्यक्ष रामदास आठवलेंना (Ramdas Athawale) घेऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला होता. पुढे आठवले भाजपसोबत (BJP) गेले आणि केंद्रात त्याना मंत्रिपद देण्यात आलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) जोगेंद्र कवाडेंसोबत युती करुन रिपब्लिकन पार्टीच्या कवाडे गटाशी हात मिळवणी केली. तर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) युती करुन एक नवीन समीकरण तयार केलं आहे. या सगळ्या युती-आघाडीमध्ये रामदास आठवले मागे पडले का? असा प्रश्न विचारला जात आहे. हा प्रश्न विचारण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आठलेंनी जाहीररित्या व्यक्त केलेली नाराजी. (prakash ambedkar alliance with thackeray kawade alliance with shinde now ramdas athawale in political trouble)

रिपब्लिकन पार्टीच्या आठवले गटाचं एक दिवसीय अभ्यास शिबीर महाबळेश्वरमध्ये पार पडलं. यावेळी भाषणामध्ये आठवलेंनी आपली नाराजी व्यक्त केली. आठवले म्हणाले ‘रिपब्लिकन पक्ष भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत युतीमध्ये असून आगामी सर्व निवडणुका आम्ही भाजप बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत युती करुन लढणार आहोत. मात्र, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत आमच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव घेतले जात नाही. ही खंत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगणार आहोत.’

आठवलेंच्या या जाहीर नाराजीमुळे आठवलेंच्या गटात सर्वकाही आलबेल नाही याचाच प्रत्यय येतोय. कुठल्याही निवडणुकीत दलित मतांचा फॅक्टर महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष रिपब्लिकन पक्षाच्या एखाद्या गटाला आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आठवलेंना सोबत घेऊन शिवसेनेने शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला होता. परंतु सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पुढे आठवले भाजपसोबत गेले. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि पुढं केंद्रात मंत्री करण्यात आलं. 2014 पासून आठवले आता मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री आहेत.

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर एकत्र नांदू शकतील का? इतिहास काय सांगतो?

हे वाचलं का?

    follow whatsapp