रतन टाटा यांनी का लिहिलं चाहत्यांना पत्र?

मुंबई तक

टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या आजवरच्या कार्याचा विचार करून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी शुक्रवारी सोशल मीडियावर मागणी करणा-या पोस्ट फिरत होत्या. मोटिवेशनल स्पिकर डॉ.विवेक बिंद्रा यांनी सर्वात प्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारं ट्विट केलं होतं. त्यानंतर #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड झाला. दिवसभर अनेकांनी पंतप्रधानांना टॅग करत रतन टाटा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या आजवरच्या कार्याचा विचार करून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी शुक्रवारी सोशल मीडियावर मागणी करणा-या पोस्ट फिरत होत्या.

मोटिवेशनल स्पिकर डॉ.विवेक बिंद्रा यांनी सर्वात प्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारं ट्विट केलं होतं. त्यानंतर #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड झाला. दिवसभर अनेकांनी पंतप्रधानांना टॅग करत रतन टाटा यांना रत्न पुरस्कार देण्याची मागणी करणारी ट्विट्स केली. पण आता खुद्द रतन टाटा यांनीच या ट्विट्सची दखल घेत त्यांच्या चाहत्यांना पत्र लिहिलं आहे.

रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी शुक्रवारी सोशल मीडियावर मोहिमच चालवली गेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करत रतन टाटा यांना रत्न पुरस्कार द्या, अशी मागणी केली जात होती. त्याचीच दखल घेत, लोकांचं प्रेम पाहून भारावून गेलेल्या रतन टाटा यांनी एक पत्र लिहून सर्वांचे आभार मानले आहेत. शिवाय आपल्याला भारतरत्न मिळावं म्हणून सुरू केलेलं कॅम्पेन थांबवण्य़ाची विनंतीही केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp