सिध्दू मूसेवाला हत्या प्रकरण: अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत झाली वाढ,नेमकं काय आहे कारण?

मुंबई तक

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची वयाच्या २८ व्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाबच्या मनसा जिल्ह्यात त्यांच्यावर ३० राउंड फायर करण्यात आल्या ज्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येची जबाबदारी कॅनडामधील गँगस्टर गोल्डी बरारने घेतली आहे. मात्र असा दावा केला जात आहे की या हत्येचं प्लानिंग दिल्लीच्या तिहार जेलमध्ये करण्यात आलं होतं. सिद्धू मूसेवाला यांच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची वयाच्या २८ व्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाबच्या मनसा जिल्ह्यात त्यांच्यावर ३० राउंड फायर करण्यात आल्या ज्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येची जबाबदारी कॅनडामधील गँगस्टर गोल्डी बरारने घेतली आहे. मात्र असा दावा केला जात आहे की या हत्येचं प्लानिंग दिल्लीच्या तिहार जेलमध्ये करण्यात आलं होतं. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी तिहार जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बरार हे एकमेकांचे साथीदार आहेत. या पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर राजस्थानमधील गँगकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्याच्या प्लानिंगपासून सुरक्षित राहावा यासाठी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, “आम्ही सलमान खानची सगळी सुरक्षा वाढवली आहे. पोलीस त्याच्या अपार्टमेंटच्या आसपास तैनात असणार आहेत. जेणेकरून त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये.”

हे वाचलं का?

    follow whatsapp