CM देवेंद्र फडणवीस विधानसभेत पुन्हा म्हणाले 'पुन्हा येऊ...', नेमकं काय घडलं?

मुंबई तक

CM Devendra Fadnavis: अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. पाहा ते नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

cm devendra fadnavis said again in maharashtra assembly we will come to power again what exactly happened
CM देवेंद्र फडणवीस
google news

मुंबई: 'मी पुन्हा येईन...', हे देवेंद्र फडणवीस यांचं विधान महाराष्ट्रातील 2019 विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड चर्चेत आलं होतं. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय गणित ज्या पद्धतीने बदलली त्यामुळे तब्बल 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं लागलं होतं. 2019 विधानसभा निवडणुकीआधी फडणवीसांनी मी पुन्हा येईन.. असं म्हणत आपणच मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ असा एक प्रकारे दावा केला होता. पण त्यांना या पदापासून आणि काही काळ सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं. याच दरम्यान, त्यांच्या 'पुन्हा येईन'च्या विधानावरून विरोधकांनी त्यांना अनेकदा चिमटेही काढले होते. दरम्यान, आज (26 फेब्रुवारी) मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत 'पुन्हा येऊ...' असं विधान केलं आहे. 

सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना 'पुन्हा येऊ...' असा दावा केला आहे. पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले. 

'पुन्हा येऊ...', पाहा विधानसभेत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले...

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, '2021-22 मध्ये देशाच्या जीडीपीमध्ये आपली हिस्सेदारी 13.1 टक्के होती. ती 2023-24 मध्ये 13.5 टक्के झाली. 2024-45 मध्ये 13.8 टक्के झाली आणि आता 14 टक्क्याच्या जवळपास राहील असं आपला प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर आपली जी हिस्सेदारी आहे ही हिस्सेदारी निश्चितपणे वाढते आहे.'

हे ही वाचा>> 'टिपू सुलतानने 75 हजार हिंदूंची कत्तल केली..' विधानसभेत फडणवीसांचं दीड तास भाषण; नेमकं काय म्हणाले?

'देशाची अर्थव्यवस्था विस्तारत होत असताना आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की, पूर्वी औद्योगिक राज्य ही 4 होती. आता 10 च्या वर झालेली आहेत. सगळी राज्य स्पर्धा करत आहेत. अशाही परिस्थितीत आपला जीडीपीमधील आपला वाटा हा सातत्याने वाढतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे.' 

हे वाचलं का?