Maha Vikas Aghadi : संभाजीराजेंनी ‘मविआ’ची लोकसभेसाठीची ‘ती’ ऑफर धुडकावली!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Sambhaji Raj has established a Swarajya organization and initially he started preparing to contest the assembly elections.
Sambhaji Raj has established a Swarajya organization and initially he started preparing to contest the assembly elections.
social share
google news

Sambhaji Raje Chhatrapati Lok Sabha 2024 : भाजप प्रणित महायुतीकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात राजकीय समीकरणं जुळवली जात असताना महाविकास आघाडीकडूनही बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडून संभाजीराजे छत्रपती यांना सोबत घेण्यास इच्छुक होती, पण एका अटीमुळे संभाजीराजेंनी ऑफर फेटाळली आहे. (Maha Vikas Aghadi Offer to Sambhaji raje for lok sabha election 2024)

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर स्वतंत्र राजकारण सुरू केलं. संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना स्थापन केली असून, सुरुवातीला त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, आता ते लोकसभा निवडणुकीतही उतरणार आहेत.

हेही वाचा >> सुनील तटकरेंचा पत्ता होणार कट? भाजपचा रायगड लोकसभेसाठी प्लॅन काय?

संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. याच संदर्भाने महाविकास आघाडी त्यांना सोबत घेण्यास इच्छुक असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीची अट

संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर किंवा छत्रपती संभाजीनगर येथून निवडणूक लढवू शकतात, असे म्हटले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीने संभाजीराजेंना पाठिंबा देण्यास सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, त्यासाठी एक अट घातली आहे.

हेही वाचा >> भाजप 400 जागा जिंकू शकतं का? प्रशांत किशोरांची मोठी भविष्यवाणी

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी एक पक्षाच्या तिकिटावर संभाजीराजेंनी निवडणूक लढवावी, तर कोल्हापुरात पाठिंबा देऊ, असा प्रस्ताव मविआचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही ऑफर संभाजीराजेंनी फेटाळून लावली आहे.

ADVERTISEMENT

संभाजीराजे काय म्हणाले तेही वाचा…

संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात ते म्हणतात, “स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल, या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे.”

ADVERTISEMENT

संभाजीराजेंचे आघाडीचे प्रयत्न

काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भूमिका मांडली होती. त्यात त्यांनी लोकसभेच्या दोन-तीन जागा लढवणार असल्याची माहिती दिली होती.

लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानंतर आता संभाजीराजे पुढे काय भूमिका घेतात आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात हे पाहावं लागेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT