पुढच्या ‘संविधान दिनी’ पंतप्रधान भाषण कुठे करणार?; शिवसेनेचा मोदींना सवाल

मुंबई तक

संविधान दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम बराच चर्चेत राहिला. विरोधकांनी बहिष्कार टाकलेल्या या कार्यक्रमात मोदींनी नाव न घेतला राजकीय घराणेशाहीवर निशाणा साधला. ‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’ असं म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. मोदींनी केलेल्या टीकेला आता शिवसेनेनं प्रत्युतर दिलं आहे. ‘काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

संविधान दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम बराच चर्चेत राहिला. विरोधकांनी बहिष्कार टाकलेल्या या कार्यक्रमात मोदींनी नाव न घेतला राजकीय घराणेशाहीवर निशाणा साधला. ‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’ असं म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. मोदींनी केलेल्या टीकेला आता शिवसेनेनं प्रत्युतर दिलं आहे. ‘काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच आहे’, असं शिवसेनेनं मोदींना सवालही केला आहे.

मोदींनी संविधान दिनी सेंट्रल हॉलमध्ये केलेल्या भाषणावर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून उत्तर दिलं आहे. “संविधान दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे महनीय विचार प्रकट केले आहेत. त्यात शुद्ध विचार किती व राजकीय विरोधकांवर हल्ले किती ते पाहावे लागेल. शुक्रवारी देशात संविधान दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोदी यांनी ‘नाव’ न घेता काँग्रेसवर टीका केली. मोदी म्हणतात, ‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’ हे लोकशाहीला घातक आहे. संविधान निर्मात्यांनी देशाच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले. आता देशहित मागे पडले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

मोदींना अजूनही काँग्रेसचे भय वाटते…

“मोदी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर काँग्रेससह बहुतेक सर्वच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त स्वपक्षाच्या खासदारांसमोरच बोलले. संविधान दिनाचे महत्त्व लक्षात घेतले तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो? दुसरे असे की, गेल्या दहा वर्षांत काँगेस राजकीयदृष्टय़ा दुर्बल झाली आहे. अशा दुर्बल झालेल्यांवर वारंवार आपले पंतप्रधान टीका करतात. याचा सरळ अर्थ असा की, पंतप्रधान मोदी यांना अजूनही काँगेसचे भय वाटते व भाजपला राष्ट्रीय स्तरावर पर्याय हा काँग्रेसच असू शकतो हे त्यांचे अंतस्थ मत आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp