Kolhapur Bypoll: ‘काँग्रेसने काय वाईट केलंय, जेवढं भाजप वाईट वागली.. मतदान काँग्रेसलाच’, शिवसेना नेत्याचा एल्गार
मुंबई: उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या आमदाराचं निधन झाल्यानंतर त्याठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे आणि शिवसैनिकांनी तगादा लावला आहे की, ती जागा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्यामुळे शिवसेनेलाच ती जागा मिळाली पाहिजे. राजेश क्षीरसागर शिवसेनेचे माजी आमदार उ. कोल्हापूरचे त्यांच्याकडे काल शिवसैनिक तिकडे पोहचले होते. त्यांनी मागणी लावून धरली होती की, महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचं नुकसान होतं आहे. त्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या आमदाराचं निधन झाल्यानंतर त्याठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे आणि शिवसैनिकांनी तगादा लावला आहे की, ती जागा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्यामुळे शिवसेनेलाच ती जागा मिळाली पाहिजे. राजेश क्षीरसागर शिवसेनेचे माजी आमदार उ. कोल्हापूरचे त्यांच्याकडे काल शिवसैनिक तिकडे पोहचले होते. त्यांनी मागणी लावून धरली होती की, महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचं नुकसान होतं आहे. त्या ठिकाणी ही जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे. दुसरीकडे मविआचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला मंजुरी देण्यात आली.
मविआ विरुद्ध भाजप अशी लढाई इथं होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालावर मविआमध्ये सगळं आलबेल आहे का हे सुद्धा ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची झाली आहे. त्यामुळेच राजेश क्षीरसागर यांना खास त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. याच बैठकीआधी राजेश क्षीरसागर यांनी मुबंई Tak ला विशेष मुलाखत दिली आहे. जाणून घ्या त्यावेळी ते नेमकं काय-काय म्हणाले.
प्रश्न: तुम्ही कोल्हापूरच्या शिवसैनिकांची मनधरणी कशी करणार आहात?
राजेश क्षीरसागर: मुख्यमंत्र्यांसोबत थोड्याच वेळात बैठक होणार आहे. एक लक्षात घ्या की, महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यावेळेला तीनही पक्षापैकी एखाद्या पक्षाचा आमदाराचं निधन झालं तर त्याच पक्षाचा उमेदवार द्यायचा हा आघाडीचा करार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने कराराप्रमाणे ही जागा काँग्रेसला देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरामध्ये एक मेळावा झाला त्यात आम्ही सर्वच पदाधिकारी होतो. यात असा सूर आला की, कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कोल्हापूरला जी जागा सोडावी अशी मागणी झाली होती.









