“उदय सामंत नावाचा साप विषच ओकणार” भास्कर जाधव यांची जहरी टीका
उदय सामंत ठाकरेंच्या गळ्यातला ताईत झाला होता. राष्ट्रवादीच्या गळ्यातला ताईत असतानाही शिवसेनेत आल्यावर त्याने ही किमया साधली अशा शब्दात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव यांनी तुफान फटकेबाजी करत उदय सामंत यांना लक्ष्य केलं. आजपासून आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू झाला. आदित्य ठाकरेंच्या भाषणाच्या […]
ADVERTISEMENT

उदय सामंत ठाकरेंच्या गळ्यातला ताईत झाला होता. राष्ट्रवादीच्या गळ्यातला ताईत असतानाही शिवसेनेत आल्यावर त्याने ही किमया साधली अशा शब्दात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव यांनी तुफान फटकेबाजी करत उदय सामंत यांना लक्ष्य केलं. आजपासून आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू झाला. आदित्य ठाकरेंच्या भाषणाच्या आधी भास्कर जाधव बोलत होते. उदय सामंत हा साप आहे तो विषच ओकणार असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.स
“उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला काय माहित?”; हिंगोलीत भास्कर जाधव कुणाला अस्वल म्हणाले?
काय म्हटलं आहे भास्कर जाधव यांनी?
राजकारणासाठी उदय सामंतने आपल्या मुलीबाळींचाही उपयोग केला. याने सांगितलं (उदय सामंत) भास्कर जाधवांनी माझ्या लफड्याचे फोटो माझ्या मुलीच्या दप्तरात टाकले. मी असं का करेन? याची मुलगी मलाही मुलीसारखीच आहे. मात्र असा घाणेरडा आरोप करणंही उदय सामंतने सोडलं नाही. याला मी विचारलं की तू राष्ट्रवादी का सोडतोस? तर म्हणाला की तुम्ही, बशिर मुर्तूजा आणि कुमार शेटे यांनी मला पाडण्याचा कट आखला. भैरीच्या देवळात येऊन मी सांगायला तयार आहे.
‘लोकशाहीची चिंता वाटते’ असं भास्कर जाधव का म्हणाले?