RFO दीपाली चव्हाणांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार: नवनीत राणा

मुंबई तक

अमरावती: मेळघाटमधील वनविभागाच्या अधिकारी RFO दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूला राज्यसरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप देखील नवनीत राणा यांनी केला आहे. यावेळी त्यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्यावर (302) खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागण देखील केली आहे. या संपूर्ण घटनेबद्दल नवनीत राणा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

अमरावती: मेळघाटमधील वनविभागाच्या अधिकारी RFO दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूला राज्यसरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप देखील नवनीत राणा यांनी केला आहे. यावेळी त्यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्यावर (302) खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागण देखील केली आहे.

या संपूर्ण घटनेबद्दल नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नवनीत राणा यांनी एक पत्रक काढून याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वन अधिकारी ते लेडी सिंघम… जाणून घ्या दीपाली चव्हाण यांच्याविषयी

पाहा नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलं: