ठाकरे सरकार वीज वापरासाठी प्रीपेड कार्ड आणणार, अजित पवारांनी दिली माहिती
वसंत मोरे, बारामती ‘एसटी महामंडळ सारखीच सध्या महावितरणची अवस्था झाली आहे. त्यामुळे येत्या काळात विजेचा वापर करण्यासाठी प्रीपेड सिस्टीम आणण्याचा विचार केला जात आहे.’ अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथे रघुनंदन पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमात एका शेतकऱ्याने वीजबिलात माफ करावे, असे निवेदन दिले. […]
ADVERTISEMENT

वसंत मोरे, बारामती
‘एसटी महामंडळ सारखीच सध्या महावितरणची अवस्था झाली आहे. त्यामुळे येत्या काळात विजेचा वापर करण्यासाठी प्रीपेड सिस्टीम आणण्याचा विचार केला जात आहे.’ अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथे रघुनंदन पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमात एका शेतकऱ्याने वीजबिलात माफ करावे, असे निवेदन दिले. त्याचा धागा पकडत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करतो. एसटी महामंडळाच्या नेमक्या काय मागणी आहे, ते तुम्ही पाहताय.’
‘शेतकऱ्यांसह अन्य घटकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला विकास कामांचा निधी वापरावा लागतो. आता मोबाईलला जसे प्रीपेड कार्ड घेतो, त्या पद्धतीने महावितरण कंपनी प्रीपेड कार्ड आणण्याचा विचार करत आहे. ज्याला वीज पाहिजे त्याने 2 ते 3 हजार रुपयांचे रिचार्ज करून दर महिन्याला वीज वापरासाठी घ्यावी लागेल.’