भाजप-शिंदेसेनेचं जागा वाटपावरुन भिजत घोंगडे, तिकडं ठाकरे बंधूंचा ठाणे अन् कल्याण-डोंबिवलीत मास्टरस्ट्रोक

मुंबई तक

Thane and Kalyan Dombivali Municipal Election : सूत्रांच्या माहितीनुसार, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आहे. ठाणे महापालिकेत सुमारे 90 टक्के जागांवर सहमती झाली असून, मीरा-भाईंदरमध्ये हे प्रमाण 95 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

ADVERTISEMENT

Thane and Kalyan Dombivali Municipal Election
Thane and Kalyan Dombivali Municipal Election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजप-शिंदेंचे सेनेचं जागा वाटपावरुन भिजत घोंगडे

point

तिकडं ठाकरे बंधूंचा ठाणे अन् कल्याण-डोंबिवलीत मास्टरस्ट्रोक

Thane and Kalyan Dombivali Municipal Election : सत्ताधारी महायुतीत जागावाटपावरून अजूनही संभ्रम आणि नाराजीचा सूर आहे. भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात नेमक्या किती आणि कुठल्या जागा कोणाला मिळणार, यावर ठोस निर्णय होताना दिसत नाही. महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी अंतर्गत मतभेद उफाळून येत असून, नाराजी थेट वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत, विरोधी बाजूला मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही गाजावाजा न करता महत्त्वाच्या महापालिकांमध्ये जागावाटपाचा मोठा टप्पा पार केल्याचे चित्र समोर आले आहे.

ठाकरे बंधूंची ठाणे महापालिकेसाठी 90 टक्के जागांवर सहमती 

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आहे. ठाणे महापालिकेत सुमारे 90 टक्के जागांवर सहमती झाली असून, मीरा-भाईंदरमध्ये हे प्रमाण 95 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. वसई-विरारमध्ये सुमारे 90 टक्के, तर कल्याण-डोंबिवलीत 85 टक्के जागावाटप निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. केवळ काही मोजक्या जागांवर चर्चा बाकी असून, त्या देखील लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: मित्राने बोलवल्यावर लॉजवर गेली, पण दारूच्या नशेत भलत्याच रूममध्ये शिरली अन् विवाहितेवर लैंगिक अत्याचार!

महायुतीत पक्षप्रवेश, उमेदवारी आणि जागावाटपावरून जेव्हा गोंधळ वाढत होता, त्याच काळात ठाकरे बंधूंमध्ये पडद्यामागे समन्वयाची प्रक्रिया सुरू होती. वरिष्ठ पातळीवरून सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर स्थानिक नेत्यांनी कामाला वेग दिला. ठाणे विभागासह अन्य महापालिकांमध्ये संभाव्य जागावाटपाचे आराखडे तयार करण्यात आले आणि त्यावर सलग बैठका झाल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp