साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी असू नये ही भूमिका योग्य नाही, गडकरींनी टोचले साहित्यिकांचे कान
योगेश पांडे, प्रतिनिधी नागपूर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी येऊ नये ही भूमिका योग्य नाही. साहित्यातून प्रेरणा घेऊन काम करणारे राजकारणी आणि समाजकारणीही एक आहे असे सांगतानाच एक दुसऱ्याशी आपला संबंधच असता कामा नये ही गोष्ट योग्य होणार नाही, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी साहित्यिकांचे कान टोचले. ते विदर्भ साहित्य संघ शताब्दी […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, प्रतिनिधी नागपूर
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी येऊ नये ही भूमिका योग्य नाही. साहित्यातून प्रेरणा घेऊन काम करणारे राजकारणी आणि समाजकारणीही एक आहे असे सांगतानाच एक दुसऱ्याशी आपला संबंधच असता कामा नये ही गोष्ट योग्य होणार नाही, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी साहित्यिकांचे कान टोचले. ते विदर्भ साहित्य संघ शताब्दी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत असताना त्यांनी ही भूमिका घेतली.
‘देवबाभळी’ पुस्तकाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार, प्राजक्त देशमुख मानकरी
राजकारण, समाजकारणासह प्रत्येक क्षेत्राचा संबंध साहित्यिकाशी आहे. प्रत्येकाने मर्यादा, जबाबदारी आणि कर्तव्याच्या बाबतीत आपली लक्ष्मणरेषा ठरवणे आवश्यक असून ती ठरवण्याची वेळ आता आली आहे असे गडकरींनी सुनावले. नागपुरला झालेल्या साहित्य संमेलनाकरीता माझ्यासह सर्वच राजकारणी निधी संकलन करीत होते. त्यावेळी तत्कालीन अध्यक्षांनी संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी नकोत, असे वक्तव्य केले.