Sanjay Raut: ‘हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवले, भिकेत मिळवलेले नाही’, राऊतांकडून कंगना-विक्रम गोखलेंवर निशाणा

मुंबई तक

प्रविण ठाकरे, नाशिक ‘तीन काळे कायदे रद्द होत आहेत, हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याचा दिवस आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवले, भिकेत मिळवलेले नाही. जवळपास 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिले. जालियानवाला बागेत ज्या पद्धतीने इंग्रजांनी लोकांना चिरडले तसेच लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडून मारले. म्हणूनच मला आजची सकाळ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य वाटते.’ असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रविण ठाकरे, नाशिक

‘तीन काळे कायदे रद्द होत आहेत, हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याचा दिवस आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवले, भिकेत मिळवलेले नाही. जवळपास 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिले. जालियानवाला बागेत ज्या पद्धतीने इंग्रजांनी लोकांना चिरडले तसेच लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडून मारले. म्हणूनच मला आजची सकाळ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य वाटते.’ असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका तर केलीच मात्र अभिनेत्री कंगना आणि अभिनेते विक्रम गोखले यांना देखील टोला लगावला. संजय राऊत हे आज (20 नोव्हेंबर) काही कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.

पाहा संजय राऊत नेमकं काय-काय म्हणाले

‘मोदींनी ‘त्या’ भीतीने तीन कृषी कायदे रद्द केले’

हे वाचलं का?

    follow whatsapp