‘ही बेकायदेशीर गुढी उद्ध्वस्त करून…’, ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, जनतेला हाक
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde, Maharashtra Politics: मराठी नववर्षानिमित्त उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून सद्यस्थितीवर भाष्य करताना पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, केंद्रीय यंत्रणा आणि स्वायत्त संस्था या मुद्द्यावर बोट ठेवत ठाकरेंनी खडेबोल सुनावले. त्याचबरोबर जनतेने संकल्प करण्याचं आवाहनही केले आहे. ठाकरेंनी सामना अग्रलेखात म्हटलं आहे, “हिंदू धर्मीयांचा नवीन वर्षाचा […]
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde, Maharashtra Politics: मराठी नववर्षानिमित्त उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून सद्यस्थितीवर भाष्य करताना पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, केंद्रीय यंत्रणा आणि स्वायत्त संस्था या मुद्द्यावर बोट ठेवत ठाकरेंनी खडेबोल सुनावले. त्याचबरोबर जनतेने संकल्प करण्याचं आवाहनही केले आहे.
ठाकरेंनी सामना अग्रलेखात म्हटलं आहे, “हिंदू धर्मीयांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून इतर सर्व सणांमध्ये गुढीपाडव्याचे एक आगळेवेगळे स्थान आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या नको तितक्या प्रभावामुळे 1 जानेवारीला सुरू होते तेच खरे नवीन वर्ष असा गैरसमज नवीन पिढीचा होऊ शकतो. मात्र मराठी पंचांगानुसार चैत्र मासारंभ म्हणजे गुढीपाडव्यालाच नूतन वर्षाची सुरुवात मानले जाते.”
“शिशिर ऋतूतील पानगळ संपवून गुढीपाडव्याला वसंत ऋतूचे आगमन होते. वृक्षसंपदेवरील जुनी पाने झडून त्यांना नवी पालवी फुटू लागते. पळस, गुलमोहर इत्यादी वृक्षांवर रंगीबेरंगी फुलांची उधळण दिसू लागते. आंबा बहरतो व पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. या अर्थाने जीवसृष्टीमध्ये स्थित्यंतर घडवणारा आणि निसर्गातील मरगळ झटकून नवचैतन्य बहाल करणारा सण म्हणून गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.”
Old Pension Scheme : संप मागे, पण खरंच जुनी पेन्शन योजना लागू होणार का?