Uddhav Thackray: “महाराष्ट्राशी नमकहरामी करणाऱ्या कोश्यारींनी राज्यपाल पदाची शान घालवली”
महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचं मीठ खाऊन त्या मीठाशी नमकहरामी करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची शान घालवली आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच जे आता नवहिंदू आहेत त्यांना यामुळे काही फरक पडलाय का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी भाजपला आणि फुटीर गटाला विचारला आहे. “मराठी माणसाला डिवचू नका” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचं मीठ खाऊन त्या मीठाशी नमकहरामी करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची शान घालवली आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच जे आता नवहिंदू आहेत त्यांना यामुळे काही फरक पडलाय का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी भाजपला आणि फुटीर गटाला विचारला आहे.
“मराठी माणसाला डिवचू नका” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज ठाकरेंचा इशारा
उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींबाबत काय म्हटलं आहे?
महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राहात आहेत आणि मराठी माणसाचा अपमान करत आहेत. महाराष्ट्राची संस्कृती आहे, सुंदर डोंगर-दऱ्या, पैठणी, शिवरायांचे किल्ले हे सगळं त्यांनी पाहिलं असेल. मात्र कोल्हापुरी जोडा कुणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दाखवायची वेळ आली आहे असं म्हणत राज्यापलांच्या मुंबई बाबतच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
राज्यपालांचं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य, शिंदे गट मोदी सरकारला पत्र लिहून तक्रार करणार










