शिंदेंचं सरकार येताच वसंत मोरेंचं आव्हान; म्हणाले, ‘कितीही ताकद लावा, पुण्याचा महापौर…’

मुंबई तक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले निर्णय बदलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात घेण्यात आलेल्या काही निर्णयातही बदलण्याची भूमिका सरकारने घेतली असून, त्यावरून मनसेचे नेते वसंत मोरे यांनी शिंदे सरकारला आव्हान दिलं. दहा बारा दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर राज्यात भाजप-शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले निर्णय बदलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात घेण्यात आलेल्या काही निर्णयातही बदलण्याची भूमिका सरकारने घेतली असून, त्यावरून मनसेचे नेते वसंत मोरे यांनी शिंदे सरकारला आव्हान दिलं.

दहा बारा दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर राज्यात भाजप-शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतली आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाकडे लक्ष वेधलं जात आहे.

‘इतकंच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे’; मुलाला धमकी येताच तात्या संतापले

सरकार स्थापन झाल्यानंतर मेट्रो-३च्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. कांजुरमार्गवरून पुन्हा कारशेड आरेमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यानंतर आता भाजप नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेले निर्णय पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp