Rain Alert : मुंबई-पुण्यासह राज्यात आज-उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा
राज्यात आजपासून पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने सांगली सोलापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण राज्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. (rain alert for mumbai and maharashtra) राज्यातील […]
ADVERTISEMENT

राज्यात आजपासून पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने सांगली सोलापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण राज्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. (rain alert for mumbai and maharashtra)
राज्यातील काही वगळता उर्वरित ठिकाणी गेल्या आठवड्यापासून पाऊस होत आहे. त्यातच आता पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. पावसाचा जोर वाढणार असून, कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीसाठी घरांकडे निघालेल्या कोकणवासीयांच्या वाटेत पावसामुळे विघ्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून कोकणसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे पुढील तीन दिवसांसाठी कोकणला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 6 ते 9 सप्टेंबरपर्यंत अतिमुसळधार पाऊस होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी (IMD Mumbai) पावसाबद्दलची माहिती दिली आहे.









