Maratha Reservation: नेमकी केव्हा झाली होती 102 वी घटनादुरुस्ती, आज का आहे चर्चेत?

मुंबई तक

मुंबई: मराठा आरक्षण रद्द करण्याचा एक मोठा निर्णय आज (5 मे) सुप्रीम कोर्टाने सुनावला आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे मराठा समाजाला एक धक्काच आहे. कारण कोर्टात आरक्षण टिकेल अशीच सर्वांना आशा होती मात्र, कोर्टाने आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्क्यांहून अधिक वाढविण्यास नकार देत आरक्षण रद्द केलं. पण याच निकालानंतर 102 वी घटना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मराठा आरक्षण रद्द करण्याचा एक मोठा निर्णय आज (5 मे) सुप्रीम कोर्टाने सुनावला आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे मराठा समाजाला एक धक्काच आहे. कारण कोर्टात आरक्षण टिकेल अशीच सर्वांना आशा होती मात्र, कोर्टाने आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्क्यांहून अधिक वाढविण्यास नकार देत आरक्षण रद्द केलं. पण याच निकालानंतर 102 वी घटना दुरुस्ती ही अधिक चर्चेत आली.

102 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. 102 व्या घटनादुरूस्तीनंतर SEBC आरक्षण देण्याचा अधिकार केवळ केंद्राच्या पातळीवर असल्याचंही यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ही 102 वी घटना दुरस्ती नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊयात.

102 वी घटना दुरुस्ती कधी झाली?

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग व अनुसूचित जमाती आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास घटनात्मक दर्जा देण्यासाठीचे 123 वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये 5 एप्रिल 2017 रोजी मांडण्यात आले. जुलै 2018 मध्ये राज्यसभेच्या मान्यतेनंतर 11 ऑगस्ट 2018 रोजी त्याचे १०२व्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp