पोलीस बदली प्रकरण : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीचं समन्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटी वसुलीच्या आरोपाचं प्रकरण चर्चेत असतानाच आता पोलीस बदल्यांच्या प्रकरणाने डोकं वर काढलं आहे. मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांकडून बदल्यांसाठी पैसे घेतल्याचा आरोप अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यावर झालेला आहे. या प्रकरणात ईडीने आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना समन्स बजावलं आहे. मात्र, चौकशीला हजर राहण्याबद्दल कुंटे यांनी असमर्थतता दर्शवली आहे.

मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री देशमुख आणि अनिल परब यांनी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. वसुली प्रकरणाची चौकशी करत असतानाच ईडीने या प्रकरणासंदर्भात सीताराम कुंटे यांना समन्स बजावलं आहे. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना सीताराम कुंटे हे गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली.

सीताराम कुंटे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. कुंटे यांना 25 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल सीताराम कुंटे यांनी असमर्थतता दर्शवली आहे. मंत्रिमंडळाची बैठक असून, बैठकीला उपस्थित राहणं आवश्यक असल्याने चौकशीसाठी हजर होऊ शकत नसल्याचं कुंटे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाझेने काय केला होता आरोप?

“तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जुलै 2020 मध्ये मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. या बदल्याबद्दल अनिल देशमुख आणि अनिल परब हे नाखुश होते. या यादीतील पोलीस अधिकाऱ्यांनी 40 कोटी रुपये जमवले. त्यापैकी 20 कोटी देशमुख यांना, तर २० कोटी परब यांना देण्यात आल्याचं मला नंतर कळलं,’ असा आरोप सचिन वाझेनं केलेला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT