एअर इंडियाचा सरकारला ‘टाटा’; साडेसहा दशकानंतर ‘महाराजा’ची मालकी पुन्हा टाटा समूहाकडे

मुंबई तक

एअर इंडियाचा ताबा आता पुन्हा एकदा म्हणजे साठ वर्षांहून अधिक काळांनी टाटांकडे आला आहे. आज लिलावात टाटा ग्रुपने एअर इंडिया खरेदी करून पुन्हा एकदा त्याचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. Welcome Back Air india असं म्हणत रतन टाटांनी यासंदर्भात ट्विटही केलं आहे. काय म्हणाले आहेत रतन टाटा? टाटा ग्रुपने एअर इंडिया लिलावात जिंकलं आहे. ही आपल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एअर इंडियाचा ताबा आता पुन्हा एकदा म्हणजे साठ वर्षांहून अधिक काळांनी टाटांकडे आला आहे. आज लिलावात टाटा ग्रुपने एअर इंडिया खरेदी करून पुन्हा एकदा त्याचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. Welcome Back Air india असं म्हणत रतन टाटांनी यासंदर्भात ट्विटही केलं आहे.

काय म्हणाले आहेत रतन टाटा?

टाटा ग्रुपने एअर इंडिया लिलावात जिंकलं आहे. ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी आहे. आता एअर इंडियाला पुन्हा तोच लौकिक मिळवून देण्यासाठी आपण सगळे नेटाने प्रयत्न करू. आपण असं केल्याने आपल्याला व्यवसायाची नवी कवाडं खुली होणार आहेत.

आज मी थोडासा भावनिक झालो आहे कारण, एअर इंडियाचा प्रवास हा MR J. R.D टाटांनी सुरू केला होता. जगातल्या सर्वात सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या एअरलाईन्सपैकी एअर इंडिया ही एक कंपनी त्यावेळी होती. आता टाटा ग्रुपला ही संधी आहे की ते गतवैभव एअर इंडियाला परत मिळवून द्यावं. त्यामुळे जे आर. डी टाटांनी काय कार्य केलं होतं हेदेखील पुन्हा एकदा जगाला कळेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp