‘गद्दारांना माफी नाही!’, असं का म्हणाले होते आनंद दिघे?; ठाण्यात काय घडलं होतं?

मुंबई तक

आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने आनंद दिघेंच्या आयुष्यातल्या अनेक प्रसंग चर्चेत आले. याच सिनेमातील एका दृश्यात आनंद दिघे ‘गद्दारांना माफी नाही’ असं म्हणताना दिसतात. पण हा संवाद आनंद दिघे नेमकं कुणासाठी म्हणाले होते, असा प्रश्न उपस्थित झाला. आनंद दिघेंच्या या डायलॉगची सगळीकडे चर्चा झाली. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने आनंद दिघेंच्या आयुष्यातल्या अनेक प्रसंग चर्चेत आले. याच सिनेमातील एका दृश्यात आनंद दिघे ‘गद्दारांना माफी नाही’ असं म्हणताना दिसतात. पण हा संवाद आनंद दिघे नेमकं कुणासाठी म्हणाले होते, असा प्रश्न उपस्थित झाला.

आनंद दिघेंच्या या डायलॉगची सगळीकडे चर्चा झाली. काय आहे या डायलॉगचा अर्थ आणि ठाण्यातल्या एका खून प्रकरणाशी याचा संबंध का जोडला जातो आहे? ते आपण जाणून घेऊयात…

1989 ला ठाण्यात महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. य़ा निवडणुकीत शिवसेनेचे 30 नगरसेवक निव़डून आले होते. काँग्रेसने देखील स्थानिक आगरी सेनेसोबत युती केली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी या निवडणुकीची जबाबदारी माजी महापौर सतीश प्रधान आणि आनंद दिघेंवर टाकली होती. प्रकाश परांजपे हे शिवसेनेकडून महापौर पदासाठी उमेदवार होते. पण 30 नगरसेवक निवडून येऊनसुध्दा शिवसेनेला त्यांच्या महापौर करता आला नाही.

अवघ्या एक मताने प्रकाश परांजपे यांचा पराभव झाला. उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीतसुध्दा सेनेचा पराभव झाला. शिवसेनेला हा पराभव खूप वर्मी लागला. बाळासाहेबांचा शब्द प्रमाण मानणारी तेव्हा शिवसेना होती. शिवसैनिक होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp