UPSC मुलाखतीत महाराष्ट्रातल्या वारली पेंटिंग साडीबाबतचा प्रश्न, अपालाने मिळवले जबरा मार्क्स!
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगातील (UPSC)परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. त्यातही मुलाखतीवेळी उमेदवाराला बुचकाळ्यात पाडणारे अनेक प्रश्न विचारले जातात. असेच काहीसे प्रश्न हे यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीत टॉपर राहिलेल्या आणि विक्रमी गुण मिळवलेल्या अपाला मिश्रा हिला विचारण्यात आले. याच सगळ्याबात अपाला मिश्रा हिने ‘न्यूज तक’शी बोलताना अनेक मजेशीर किस्से […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगातील (UPSC)परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. त्यातही मुलाखतीवेळी उमेदवाराला बुचकाळ्यात पाडणारे अनेक प्रश्न विचारले जातात. असेच काहीसे प्रश्न हे यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीत टॉपर राहिलेल्या आणि विक्रमी गुण मिळवलेल्या अपाला मिश्रा हिला विचारण्यात आले. याच सगळ्याबात अपाला मिश्रा हिने ‘न्यूज तक’शी बोलताना अनेक मजेशीर किस्से सांगितले आहेत.
गाझियाबादच्या अपाला मिश्रा या तरुणीने यूपीएससी परीक्षेत घवघवीत असं यश मिळविलं आहे. तिला तिच्या मुलाखती अनेक इंटरेस्टिंग असे प्रश्न विचारण्यात आले.
यूपीएससी परीक्षेत अपालाने फक्त नववा क्रमांकच नाही मिळवला तर मुलाखतीत विक्रमी गुणंही मिळवले. मागील वर्षी मुलाखतीत 212 गुणांचा विक्रम होता. हाच विक्रम अपालाने तोडला आहे. तिने मुलाखतीत यावेळी 215 गुण मिळवले आहेत. अपाला हिची मुलाखत तब्बल 40 मिनिटं सुरु होती. त्यावेळी मुलाखत घेणाऱ्या पॅनलने अपालाला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले.