NCP: फडणवीसांचं ‘ते’ पत्र, अजित पवार गटाने हात केले वर..! आता नवाब मलिकांचं काय होणार?

साहिल जोशी

ADVERTISEMENT

ajit dada two steps back after devendra fadnavis letter ajit pawars group got involved in the matter of nawab malik sunil tatkare tweet gives a new twist
ajit dada two steps back after devendra fadnavis letter ajit pawars group got involved in the matter of nawab malik sunil tatkare tweet gives a new twist
social share
google news

Nawab Malik: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे आज (7 डिसेंबर) सत्ताधाऱ्यांसोबत गेल्यानंतर विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच देवेंद्र फडणवीसांनी एक जाहीर पत्र लिहून मलिकांना महायुतीत घेऊ नका अशी सूचना अजित पवार यांना केली होती. त्यांच्या याच पत्रानंतर आता अजित पवार गटाने देखील आता या प्रकरणात आपले हात वर केले आहेत. त्यामुळे आता नवाब मलिक हेच खिंडीत सापडल्याचं पाहायला मिळतंय. (ajit dada two steps back after devendra fadnavis letter ajit pawars group got involved in the matter of nawab malik sunil tatkare tweet gives a new twist)

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक हे कोणत्या पवार गटासोबत जाणार आहेत हे आतापर्यंत स्पष्ट नव्हतं. मात्र, आज विधिमंडळ परिसरात आल्यानंतर नवाब मलिक हे सगळ्यात आधी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या दालनात गेले. तसेच त्यानंतर ते सत्ताधारी बाकांवर जाऊन बसल्याचा दावा विरोधकांनी केला. या सगळ्यानंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं.

यामुळे फडणवीसांनी देखील खुलं पत्र लिहून नवाब मलिक हे आपल्यासोबत नकोत असं अजित पवारांना सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘राष्ट्रवादी काँग्रेस मलिकांसोबत राहील’, असं म्हणाले अजित पवार गटाचे नेते..

दरम्यान, या पत्रानंतर अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी मुंबई Tak सोबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांची मागणी चुकीची असल्याचं म्हटलं. ‘नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे तुम्ही त्यांना आरोपी का समजता?’ असा सवालही केला होता. त्याचबरोबर नवाब मलिक यांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभा राहील असंही त्यांनी म्हटलं होतं.

हे ही वाचा>> Nawab Malik: ‘सरडा, आत्महत्या.. सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ एका विधानाने.. फडणवीस सापडले कोंडीत?

अन् आता अजित पवार गटाने हात केले वर…

खरं तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केल्याने प्रत्येक आमदार आपल्या गटात यावा यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. जेव्हा मलिक हे तुरुंगातून सुटून आले होते. तेव्हा स्वत: अजित पवार हे त्यांच्या भेटीसाठी घरी गेले होते. अखेर आज मलिकांनी अजित पवारांसोबत असल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिलं. पण त्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला.

ADVERTISEMENT

या सगळ्या वादामुळे देवेंद्र फडणवीसांनी जे पत्र अजित पवारांना लिहलं. त्यानंतर आता अजित पवार गटाने या प्रकरणात आपले हात वर केल्याचं पाहायला मिळत आहे. कारण याबाबत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक ट्वीट करून या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Devendra Fadnavis: सत्ताधाऱ्यांसोबत बसलेल्या नवाब मलिकांवर फडणवीसांनी केलेले ‘हे’ आरोप, अन् आज..

‘आमदार श्री. नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे.’ असं ट्वीट सुनील तटकरे यांनी केला आहे.

नवाब मलिक सापडले खिंडीत?

सुनील तटकरे यांच्या या ट्वीटवरून हे स्पष्टपणे दिसतं आहे की, आता अजित पवार गट हा नवाब मलिक यांना सध्या तरी आपल्यापासून दोन हात दूरच ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे नवाब मलिकांनी आपल्या कृतीतून आपण कोणासोबत आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याने आता शरद पवार गटात त्यांच्याविषयी एक वेगळ्या प्रकारचं मत तयार झालं आहे. तर दुसरीकडे फडणवीसांच्या पत्रामुळे नवाब मलिकांना आपल्या गटात सामावून घेणं हे अजित पवार गटासाठी कठीण होऊन बसलं आहे. यामुळेच आता नवाब हे राजकीयदृष्ट्या पुरते खिंडीत अडकले असल्याचं पाहायला मिळत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT