Andheri Bypoll : भाजपने माघार घेऊनही ऋतुजा लटकेंना निवडणूक लढवावी लागणार, ‘हे’ उमेदवार रिंगणात
अंधेरीची पोटनिवडणूक हा मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय होता. याच निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. ज्यामध्ये भाजपने माघार घेतली आहे. भाजपने या निवडणुकीसाठी भरपूर तयारी केली होती. मात्र त्यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे. असं असलं तरीही ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. कारण निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायची वेळ संपली आहे. तसंच अजूनही […]
ADVERTISEMENT

अंधेरीची पोटनिवडणूक हा मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय होता. याच निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. ज्यामध्ये भाजपने माघार घेतली आहे. भाजपने या निवडणुकीसाठी भरपूर तयारी केली होती. मात्र त्यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे. असं असलं तरीही ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. कारण निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायची वेळ संपली आहे. तसंच अजूनही सात उमेदवार रिंगणात आहेत.
कोणते उमेदवार आता रिंगणात आहेत?
१) ऋतुजा लटके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
२) बाळा नाडार-आपकी अपनी पार्टी (पिपल्स)
३) मनोज कुमार नायक-राईट टू रिकॉल पार्टी