“एकतर निर्लज्ज असाव लागतं किंवा काँग्रेस अन् लाचार सेनेसारखं…”; भाजपचं व्हिडीओतून टीकास्त्र

मुंबई तक

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेतेही सहभागी झाले. यात चर्चा झाली ती आदित्य ठाकरेंच्या यात्रेतील सहभागाची. त्यावरूनच भाजपनं व्हिडीओतून राहुल गांधी, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण डागलेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेतेही सहभागी झाले. यात चर्चा झाली ती आदित्य ठाकरेंच्या यात्रेतील सहभागाची. त्यावरूनच भाजपनं व्हिडीओतून राहुल गांधी, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण डागलेत.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले नाही, मात्र आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी पदयात्रेत हजेरी लावली.

आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चाही झाली आणि त्यामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या नव्या राजकीय समीकरणांचीही! आदित्य ठाकरेंच्या भारत जोडो यात्रेवरून भाजपनं बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेचा दाखला देत निशाणा साधलाय.

राहुल गांधी-आदित्य ठाकरे : भारत जोडो यात्रेबद्दल भाजपनं काय म्हटलंय?

“वारसा हा विचारांचा असतो. फक्त रक्ताच्या नात्यानं कुणी वारसदार ठरत नसतो, याचा पूर्णपणे विसर पडलेले दोन नातू. राहुल व आदित्य सध्या भारत जोडो सर्कशीत रममाण आहेत. ही सत्तेची हावच आहे, जी दोघांना एकत्र येण्यास भाग पाडते”, असं म्हणत भाजपनं आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींना लक्ष्य केलंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp