Mangesh Chavan : “एकनाथ खडसे म्हणजे विकृती, राष्ट्रवादी काँग्रेससाठी पनवती”

मुंबई तक

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. खडसेंनी केलेल्या टीकेवर बोलताना भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आम्ही तुमचा इतिहास काढू असा इशारा दिला.

ADVERTISEMENT

BJP MLA Mangesh Chavan warned eknath khadse after his statement about girish mahajan
BJP MLA Mangesh Chavan warned eknath khadse after his statement about girish mahajan
social share
google news

“काही वर्षांपूर्वी फर्दापूरच्या विश्रामगृहात एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत कोण पकडलं गेलं होतं? माझी चूक झाली, मी त्यावेळेस त्यांना सोडलं. मी तिथं पोहचलो म्हणून वाचले. पोलिसांना अटक करू दिली असती, तर आज फायद्यात राहिला असतो”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना म्हणाले. खडसेंच्या याच विधानावर बोलताना भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आम्ही तुमचा खरा इतिहास बाहेर काढू असा इशारा दिला. इतकंच नाही, तर खडसे म्हणजे विकृती, अशी टीकाही त्यांनी केली.

जळगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चव्हाण म्हणाले, “ते वयाने मोठे झाले आहेत. त्यांनी राजकारणात एक चांगला आदर्श पायंडा या जिल्ह्यात घालायला पाहिजे. ते पदावर असताना, त्यांना लोकांनी मानसन्मान दिला. ते पदावर होते म्हणून. त्यांच्या जागेवर जे काम करतात, मग ते मंत्री असतील… ते चांगलं काम करताहेत म्हणून त्यांना (एकनाथ खडसे) खपवले जात नाही, हे यातून सिद्ध होतं.”

पुढे बोलताना मंगेश चव्हाण म्हणाले, “तुम्ही (एकनाथ खडसे) असताना सगळे खडसे साहेब म्हणायचे. भाऊ म्हणायचे. अतिशय डोक्यावर तुम्हाला या जिल्ह्याने घेतलं. दुर्दैवाने तुम्हाला लोकांचं प्रेम पचवता आलं नाही. आणि आता गिरीश महाजन असतील, दुसरे पालकमंत्री असतील, ते जे काम करताहेत. विकास कामांना सोडून उगीच दुसरीकडे भरकवटायचं. लोकांना दुसरीकडे न्यायचं”, अशी टीका चव्हाण यांनी केली.

या माणसाने लोकांना आयुष्यातून उठवलं -आमदार मंगेश चव्हाण

मंगेश चव्हाण यांनी गंभीर विधान यावेळी केलं. ते म्हणाले, “कपोलकल्पित कहाण्या काहीतरी लोकांना सांगायच्या. म्हणजे खडसेंबाबत बोलायचं म्हटलं, तर खडसे हे एक विकृती आहे, असं मला वाटतं. या माणसाने आयुष्यात काहीही चांगलं केलं नाही. लोकांना आयुष्यातून उठवणं. लोकांना गुन्ह्यात अडकवणं. नको त्या भानगडी लावल्या. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण केली. त्याच समाजातील लोक त्याच समाजापुढे उभे कसे करता येतील, कुणाला दाबता कसं येईल, अनेक संस्थांमधील लोकांना त्रास दिला.”

हे वाचलं का?

    follow whatsapp