‘पत्रकारांना ढाब्यावर न्या’, चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले? कारणही सांगितलं
पत्रकारांबद्दल केलेल्या विधानामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे टीकेचे धनी ठरले आहेत. त्यांच्यावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
ADVERTISEMENT

BJP Chandrashekhar Bawankule controversy : ‘पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवायचं म्हणजे समजलंच असेल तुम्हाला.’ हे विधान आहे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं. याच विधानामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. बावनकुळेंच्या विधानावर बोट ठेवत विरोधकांनी त्यांना घेरलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांनी बावनकुळेंवर टीकेचे बाण डागलेत.
झालं असं की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत 24 सप्टेंबरला अहमदनगरमध्ये ‘महाविजय 2024’ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठक पार पडली. या बैठकीत बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना कोणता सल्ला दिला?
बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना एक विधान केलं. ते म्हणाले, ‘ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावं. आपण एवढं चांगलं काम करतोय, पण हे असं टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. एक दोन पोर्टलवाले प्रिंटवाले, इलेक्ट्रॉनिकवाले असतील त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवायचं म्हणजे समजलंच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झालं तर सुजय विखे आहेतच. महाविजय २०२४ पर्यंत बुथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजे याची काळजी घ्या.’
हेही वाचा >> ‘…अन्यथा मुख्यमंत्री व्हायचं केवळ स्वप्न राहतं’, अजित पवार असं का बोलले?
बावनकुळेंच्या हे विधान माध्यमांमधून समोर आलं. सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यांची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.