ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा! भाजपची अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर भाजपनं माघार घेण्यचा निर्णय घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय.

रमेश लटकेंच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. ही निवडणूक लढवण्याची भूमिका भाजपनं सुरुवातीला घेतली होती. भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर निवडणुकीला वेगळं वळणं मिळालं होतं.

राज ठाकरे, शरद पवार आणि प्रताप सरनाईक यांनी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केल्यानंतर भाजप माघार घेईल, अशीच चर्चा सुरू झाली होती. त्यानुषंगाने चर्चा सुरू होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं राजकारण…’, ठाकरेंनी मानले पवारांचे आभार, राज ठाकरेंबद्दल मौन

भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी.टी. रवी यांच्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची बैठक झाली. त्याचबरोबर आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा झाली. राज ठाकरे आणि शरद पवारांपाठोपाठ सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटानेच बिनविरोधाची मागणी केल्यानं भाजपवर दबाव वाढल्याचं बोललं जात होतं.

ADVERTISEMENT

‘…तर मी काही बोललो नसतो’; गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत शरद पवार अंधेरी पोटनिवडणुकीबद्दल काय बोलले?

ADVERTISEMENT

चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याबद्दल काय सांगितलं?

मुंबईत भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, ऋतुजा लटके यांना भाजप पाठिंबा देत असून, भाजप उमेदवार निवडणूक लढवणार नाही. मुरजी पटेल अर्ज मागे घेत असून, ते अपक्षही लढणार नाहीत, असं बावनकुळे म्हणाले.

निवडणूक लढवण्याची आशिष शेलारांची होती भूमिका?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आधीच उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळे विरोधात शिंदे गट उमेदवारी देणार की भाजप अशी उत्सुकता होती. मात्र, आशिष शेलार यांनी लगेच मुरजी पटेलांच्या नावाची घोषणा केली होती.

मुरजी पटेलांच्या नावाची घोषणा पक्षाकडून अधिकृतपणे अखेरच्या दिवशी करण्यात आली. मात्र त्यापूर्वीच मुरजी पटेल हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होते. मात्र, त्यांना थांबवलं गेलं होतं. पटेल हे शेलारांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळेच आशिष शेलार ही निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जात होतं.

आशिष शेलार सुरुवातीपासून या निवडणुकीच्या तयारीत होते आणि त्यामुळे मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी राज ठाकरेंनाही भेटले होते. त्यामुळेच आशिष शेलाराची निवडणुकीबद्दलची भूमिका आणि बिनविरोध करण्याची मागणी अशा पेचात भाजप होती. त्यानंतर भाजपनं उमेदवारी अर्ज घेण्यासाठी काही तास अवधी असताना हा निर्णय घेतला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT