Sanjay Raut: एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट भाजपमध्ये मनानं, तनानं आणि धनानं विलीन झाले

मुंबई तक

२१ जूनला शिवसेनेत बंड झालं आणि ते आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलं. कारण शिवसेना सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत आधी सुरत त्यानंतर गुवाहाटी गाठलं. त्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री झाले. असं असलं तरीही हे सगळे आमदार आम्ही शिवसेनेत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

२१ जूनला शिवसेनेत बंड झालं आणि ते आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलं. कारण शिवसेना सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत आधी सुरत त्यानंतर गुवाहाटी गाठलं. त्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री झाले. असं असलं तरीही हे सगळे आमदार आम्ही शिवसेनेत आहोत असंच सांगत आहेत. भाजप नेतेही आम्ही मूळ शिवसेनेसोबत युती केली आहे हे सांगत आहेत. आता याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Eknath Shinde : “वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, रेडा, कुत्रे म्हणायचं, आणि…”

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचा गट हे भाजपमध्ये तनानं, मनानं आणि धनानं विलीन झाले आहेत. आम्ही शिवसैनिक आहोत हे ते फक्त तोंडाने सांगत आहेत. त्याला काहीही अर्थ नाही असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना पक्षाशिवाय बंडखोर आमदारांचं वेगळं अस्तित्व नाही, त्यामुळे ते हेच सांगत आहेत की आम्ही अजून शिवसेनेत आहोत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदार शिवसेनेत नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हे भाष्य केलं आहे.

Narayan Rane :”शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता गप्प बसून आराम करावा”

हे वाचलं का?

    follow whatsapp