Mla Disqualification : ‘या’ पाच कारणांमुळे ठाकरेंच्या विरोधात लागला निकाल!
Uddhav Thackeray vs eknath shinde, Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांविरोधातील अपात्रतेच्या खटल्याचा निकाल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. यावेळी ते म्हणाले की, शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे पुढील एक वर्ष तरी ते […]
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray vs eknath shinde, Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांविरोधातील अपात्रतेच्या खटल्याचा निकाल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. यावेळी ते म्हणाले की, शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे पुढील एक वर्ष तरी ते मुख्यमंत्री राहतील, हे निश्चित झालं आहे. पण, हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात का गेला. निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी त्याची कारणेही स्पष्ट केली आहेत.
विधानसभा अध्यक्ष निकाल देताना काय म्हणाले आणि त्यांनी कोणत्या बाबी मांडल्याते पाच मुद्द्यांमध्ये समजून घेऊ.
1. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय – शिंदे गट हीच खरी शिवसेना
निर्णयाचा आधार- निवडणूक आयोगाकडील रेकॉर्ड
निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी पहिली महत्त्वाची टिप्पणी केली. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. हा निर्णय देताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या नोंदींचा आधार घेतला. राहुल नार्वेकर म्हणाले की, शिवसेनेच्या दोन गटांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या घटनेवर एकमत नाही. नेतृत्व रचनेबाबत दोन्ही पक्षांची मते भिन्न आहेत. एकमेव पैलू आहे तो बहुमताचा. ते म्हणाले की, वादाच्या आधी अस्तित्वात असलेली नेतृत्व रचना लक्षात घेऊन मला संबंधित घटना ठरवावी लागेल. ते म्हणाले की, 2018 ची सुधारित घटना निवडणूक आयोगाकडे नोंदवली गेलेली नाहीये. शिवसेनेची फक्त 1999 ची घटना वैध आहे.
2. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय : शिंदे यांना हटवण्याचा निर्णय होता चुकीचा
निर्णयाचा आधार – घटनेत पक्षप्रमुखाचे कोणतेही पद नाही