शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार?-राज ठाकरेंचा सवाल

मुंबई तक

Raj Thackeray Pune Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पुण्यात सभा घेऊन आपण अयोध्या दौरा का रद्द केला हे स्पष्टच सांगितलं. मनसैनिकांना अडकवण्याचा ट्रॅप होता त्यामुळे आपण अयोध्येला जाणं रद्द करत आहोत. मला शिव्या घातल्या तरीही चालतील पण मला माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं महत्त्व जास्त आहे त्यांना काहीही होऊ नये म्हणून मी दौरा स्थगित केला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Raj Thackeray Pune Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पुण्यात सभा घेऊन आपण अयोध्या दौरा का रद्द केला हे स्पष्टच सांगितलं. मनसैनिकांना अडकवण्याचा ट्रॅप होता त्यामुळे आपण अयोध्येला जाणं रद्द करत आहोत. मला शिव्या घातल्या तरीही चालतील पण मला माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं महत्त्व जास्त आहे त्यांना काहीही होऊ नये म्हणून मी दौरा स्थगित केला असं राज ठाकरे म्हणाले. याच भाषणात त्यांनी शरद पवारांवरही टीका केली.

भाषणाला सुरूवात केली त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आपल्याला बंदिस्त सभा घ्यायची सवय नाही. पण सध्या पाऊस कधीही येऊ शकतो असं वातावरण आहे. मी म्हटलं निवडणुका नाहीत पावसात का भिजायचं? असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांच्या पावसातल्या भाषणावरून त्यांना टोला लगावला. शरद पवार २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात पाऊस पडला होता तेव्हा भिजले होते. त्या एका भाषणाने सगळं गणित फिरवलं. राज ठाकरेंनी तोच उल्लेख करत शरद पवारांना टोला लगावला.

काय म्हणाले राज ठाकरे शरद पवारांविषयी?

शरद पवारांना औरंगजेब जर सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार. औरंगजेब शिवाजी महाराजांना मारायला आला नव्हता. तर साम्राज्य विस्तार करण्यासाठी आला होता. मग काय शिवाजी महाराज यांच्यामध्ये आले होते का? स्वतःच्या सोयीसाठी इतिहास बदलू नका असंही म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांनी टीका केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp