Republic of Bharat : मोदी सरकार बदलणार देशाचे नाव? दिले स्पष्ट संकेत
Modi government going to end the English name from India to Bharat : भारताचा इंग्रजीत इंडिया असा उल्लेख केला जातो. मात्र, हा शब्द संपवण्याचे संकेत मोदी सरकारने दिले आहेत.
ADVERTISEMENT

India Rename as Bharat news Marathi : G20 परिषदेनंतर केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या एका निर्णयाने गेल्या आठवडाभरापासून राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात काय होणार, याबाबत केवळ अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, मंगळवारी (5 सप्टेंबर) आणखी एक नवीन बाब समोर आली. ज्यातून मोदी सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. असे बोलले जात आहे की, संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान केंद्र सरकार देशाचे नाव बदलून (इंडिया नाव बदलून भारत) करण्याचा प्रस्ताव ठेवू शकते. (Is Modi government going to end the English name of the country)
नाव बदलले जाणार याचा अर्थ आता देशाचे नाव भारत गणराज्य असे असेल. लवकरच देशाला इंडिया म्हणणे ही भूतकाळातील गोष्ट ठरू शकते. असे झाल्यास नव्याने स्थापन झालेल्या INDIA आघाडीसाठी हा मोठा धक्का ठरेल. कारण या आघाडीने स्वतःला राष्ट्र हिताला प्राधान्य देत आधाडीला इंग्रजी इंडिया असे नाव दिले.
देशाचे नाव बदलणार, कसे आले समोर?
केंद्र सरकारच्या मनात नेमकं काय आहे, हे लवकरच कळेल. पण, देशाचे इंडिया नाव कायम स्वरुपी संपवण्याचा केंद्राचा विचार असल्याच्या चर्चेला बळ कसे मिळाले, ते पाहुयात. गेल्या दोन दिवसांपासून या चर्चेला खतपाणी देणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मंगळवारी (5 सप्टेंबर) सकाळी हे उघड झाले की, भारताच्या प्रेसीडेंसी G20 ने G-20 भारत हे नवीन हँडल लॉन्च केले आहे. हे G20 चे अतिरिक्त X खाते (ट्विटर) असेल. या अंतर्गत, G20 शी संबंधित टिप्पण्या आणि माहिती भारत नावाने अधिकृत पणे प्रसिद्ध केल्या जातील.
हेही वाचा >> ‘अजित पवारांना राष्ट्रवादीत आणण्याचा घाट’, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
G20 डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवरही ‘भारत’
त्याचप्रमाणे दुसरी बातमी अशी आहे की राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी जी-20 डिनरसाठी पाठवलेले निमंत्रण पत्रही ‘भारताचे राष्ट्रपती’च्या (President of Bharat) नावाने पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत सामान्य व्यवहारात यासाठी फक्त president of India असे वापरले गेले आहे.