India Today Conclave Mumbai : ते कबूल कसं करतील?, उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा प्रहार

मुंबई तक

एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेना आणि शिवसेना समर्थक अपक्षा आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि ५० आमदारांना गद्दार म्हणत डिवचलं. इतकंच नाही, तर हे खोके सरकार आहे, असाही आरोप केला. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुंबईत इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२२ मध्ये झालेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ठाकरेंवर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेना आणि शिवसेना समर्थक अपक्षा आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि ५० आमदारांना गद्दार म्हणत डिवचलं. इतकंच नाही, तर हे खोके सरकार आहे, असाही आरोप केला. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुंबईत इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२२ मध्ये झालेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ठाकरेंवर प्रहार केला.

उद्धव ठाकरे यांच्याकडून हे खोके सरकार असल्याचा तसेच गद्दारांचं सरकार असल्याचा आरोप सातत्यानं होतोय. उपयोग संपल्यानंतर शिंदे गटाला भाजप सोडून देईल, असंही ते म्हणताहेत. तुम्ही याकडे कसं बघता असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) बोलण्यासाठी दुसरं काय आहे? दोनच तर आहे. एक खोके आणि दुसरं गद्दार. पण आम्ही निष्ठावंत आहोत. आम्ही लोकांनी क्रांती केलीये. हा खूप मोठा उठाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे का झालं?”, असा उलट सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केलाय.

India Today Conclave 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बंडानंतरची रोखठोक मुलाखत

हे वाचलं का?

    follow whatsapp