वारकऱ्यांवर ‘लाठीचार्ज’! जयंत पाटील, राऊतांचा संताप, सुप्रिया सुळेंनीही सुनावलं
आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज (lathi charge) केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT

Latest Marathi News : दरवर्षी आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari) लाखो वारकरी पंढरपूरात दाखल होत असतात. यावर्षी देखील मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरसाठी निघाले आहेत. या दरम्यान आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज (lathi charge) केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचा दाखल देऊन आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरत टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान विरोधकांनी नेमके सरकारवर काय आरोप केले आहेत, ते जाणून घेऊयात. (lathi charge by police on varkari in alandi sanjay raut supriya sule criticize shinde fadnavis government)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकारावर सरकारवर हल्लाबोल केला आहे. वारकऱ्यांनी आज पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आहेत, उद्या बंदुकांचा सामना करावा लागेल, आणि हे म्हणे हिंदुत्ववादी सरकार,अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तीर्थ पर्यटन करणारे मुख्यमंत्री कुठे आहेत? हिंदू आक्रोश मोर्चा काढणारे कुठे आहेत? देवेंद्र जी आता तुम्हीच सांगा तुमच्या राज्यात औरंग्या नक्की कोणाच्या अंगात संचारला आहे? असे अनेक सवाल संजय राऊत यांनी सरकारला विचारले आहेत. तसेच हिंदूत्ववादी सरकारचे ढोंग उघडे पडले आहे, मुखवटे गळून पडले, औरंगजेब यापेक्षा वेगळे काय वागत होता? वारकऱ्यांचा हिंदू आक्रोश सरकार असा चिरडून टाकत आहे. मोगलाई महाराष्ट्रात पुन्हा अवतरली आहे,अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.
हे म्हणे हिंदुत्ववादी सरकार.
वारकऱ्यांनी आज पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या.उद्या बंदुकांचा सामना करावा लागेल.हेच पाहायचे उरले होते..तीर्थ पर्यटन करणारे मुख्यमंत्री कोठे आहेत? हिंदू आक्रोश मोर्चा काढणारे कोठे आहेत? देवेंद्र जी आता तुम्हीच सांगा तुमच्या राज्यात औरंग्या नक्की कोणाच्या… https://t.co/bxSMwm5LZ9— Sanjay Raut (@rautsanjay61) June 11, 2023
हे ही वाचा : वारकऱ्यांवरील लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले, ‘मविआच्या काळात…’
संजय राऊतांपाठोपाठ खासदार सु्प्रिया सुळे यांनी देखील वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध केला आहे. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण यापूर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. जे आजवर कधीही घडले नव्हते ते यावर्षी घडले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.तसेच माऊलींच्या दिंडी सोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले आहे. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठी हल्ला अतिशय संतापजनक आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.