MNS: “तुमचं सगळ्या गावाशी जमतंय पण भावाशी जमत नाही”

मुंबई तक

औरंगाबाद: मनसेच्या औरंगाबादमधील सभेत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान टीका केली आहे. खास मराठवाड्यातील शैलीत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘तुमचं सगळ्या गावाशी जमतंय पण भावाशी जमत नाही. ज्या भावाने तुम्हाला महाबळेश्वरमध्ये भरलेलं ताट दिलं आणि तुला नेता हो म्हटलं.. त्या भावाची मर्जी सुद्धा तुम्ही राखली नाही. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

औरंगाबाद: मनसेच्या औरंगाबादमधील सभेत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान टीका केली आहे. खास मराठवाड्यातील शैलीत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

‘तुमचं सगळ्या गावाशी जमतंय पण भावाशी जमत नाही. ज्या भावाने तुम्हाला महाबळेश्वरमध्ये भरलेलं ताट दिलं आणि तुला नेता हो म्हटलं.. त्या भावाची मर्जी सुद्धा तुम्ही राखली नाही. एवढ्या कोत्या मनाचे तुम्ही आहात.’ असं म्हणत प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.

प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले?

‘हनुमान चालीसा म्हणायला दोन नवरा-बायको येणार म्हणून आमचे मुख्यमंत्री पळून गेले. अरे वडिलोपार्जित घराचं रक्षण कोणी करायचं? इथे एक म्हातारी आणून बसवली. अरे तुमच्याने रक्षण होणार नाही हे बाळासाहेबांनी तेव्हाच कळालं होतं. तुमचं सगळ्या गावाशी जमतंय पण भावाशी जमत नाही.’

हे वाचलं का?

    follow whatsapp