मविआची निर्मिती ३६ दिवसात! पण शिंदे फडणवीस सरकार आल्यावर दुरावाही ३६ दिवसातच

मुंबई तक

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतर महाराष्ट्रात झालेले दोन प्रयोग आजही लोकांच्या लक्षात आहेत. पहिला प्रयोग होता पहाटेचा शपथविधी. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. एका रात्रीत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट उठवून या दोघांना शपथ दिली, मात्र हे सरकार पडलं. त्यानंतर प्रयोग झाला तो महाविकास आघाडीचा. शिवसेना, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतर महाराष्ट्रात झालेले दोन प्रयोग आजही लोकांच्या लक्षात आहेत. पहिला प्रयोग होता पहाटेचा शपथविधी. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. एका रात्रीत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट उठवून या दोघांना शपथ दिली, मात्र हे सरकार पडलं. त्यानंतर प्रयोग झाला तो महाविकास आघाडीचा. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झालं होतं जे अडीच वर्ष चाललं.

महाविकास आघाडी हा महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला अभूतपूर्व प्रयोग

महाविकास आघाडी हा महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला अभूतपूर्व प्रयोग होता हे सत्य कुणीही नाकारणार नाही. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढली गेली असे दोन पक्ष म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रयोगामुळे सत्तेत आले. शिवसेना आणि भाजपचं मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे वाटून घेण्यावरून वाजलं. तडजोडी होतील असं वाटत असतानाच या दोन्ही पक्षांमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला आणि महाविकास आघाडी जन्माला आली.

महाविकास आघाडीचा प्रयोग होण्यासाठी दोन-तीन नाही तर तब्बल ३६ दिवस लागले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांची मोट बांधण्याचं काम दोघांनी केलं. पहिले होते शरद पवार आणि दुसरे होते संजय राऊत. ३६ दिवस चर्चेच्या फेऱ्या, बैठकांची सत्रं चालली. त्यानंतर किमान समान कार्यक्रम तयार झाला आणि महाविकास आघाडी स्थापन होत मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले.

महाविकास आघाडीमध्ये ३६ दिवसात दुरावाही आला

राज्यात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदारही गेले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळलं. मात्र महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मोट कायम होती. याच महाविकास आघाडीत दुरावा निर्माण व्हायलाही ३६ दिवस लागले.

हे वाचलं का?

    follow whatsapp