महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रात हा प्रश्न राजकीय सामाजिक दृष्ट्या संवेदनशील बनला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्याकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याचं आवाहन महाराष्ट्रातील खासदारांना केलेलं आहे. त्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाने लोकसंख्या नियंत्रणाचा विषय मांडला. एक कुटुंब एक अपत्य या विषयावर चर्चा करण्याची मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाने केली. हा विषय गंभीर असून, अधिवेशनात यावर सर्व अंगाने चर्चा व्हावी. लोकसंख्या नियंत्रण विधेयक मंजूर करण्यात यावं, अशी मागणी शिंदे गटाने केली.