राज्यसभा निवडणूक : भाजपमुळे शिवसेनेनं आमदारांचं हॉटेल बदललं, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

ऋत्विक भालेकर

राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून मतांची बेरीज सुरु असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदार आणि समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे. राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या जागेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून मतांची बेरीज सुरु असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदार आणि समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या जागेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता अपक्ष आमदारांना स्वतःच्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

राज्यसभेसाठी २४ वर्षानंतर मतदान; १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार कसा पडला होता?

राज्यात राजकीय भेटीगाठी वाढल्या असून, मतं फुटू नये म्हणून राजकीय पक्षांकडून आमदारांना एका ठिकाणी ठेवण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला चार दिवस बाकी असताना मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आणि समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp