शिंदेंच्या दोन नेत्यांमध्ये राजकीय कुस्ती, अनिल परबांकडून थेट विजयी उमेदवाराचं घोषित

ऋत्विक भालेकर

गजाभाऊंच्या या आरोपावर बोलताना अनिल परब म्हणाले, या गोष्टी आम्हाला माहितीच आहेत. पण गजाभाऊंनी प्रसिद्धी पत्रक काढून अख्ख्या महाराष्ट्राला सांगितलं. तसेच हे उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत नव्हे तर बाळासाहेबांच्या वेळेस हे घडलं असल्याचेही परब म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Anil Parab Reaction on Ram kadam vs Gajanan Kirtikar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील दोन ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांच्यात सध्या राजकीय कुस्ती रंगली आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करत आहेत. अशात आता या दोन्ही नेत्यांची ज्या मुद्यावरून शाब्दीक कुस्ती रंगली होती, त्या उत्तर लोकसभा मतदार संघातून थेट (UBT)ठाकरेंचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी शिवसेनेचा उमेदवारचं विजयी घोषित केला आहे. गजानन किर्तीकर असो किंवा रामदास कदमांचा मुलगा असो, जिंकणार अमोल किर्तीकरच…शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार हे मी छातीठोकपणे सांगतो, असे अनिल परब यांनी मुंबई Tak शी बोलताना सांगितले आहे. (ram kadam vs gajanan kirtikar anil parab reaction cm eknath shinde udhhav thackeray balasaheb thackeray maharashtra politics)

गजानन किर्तीकर आणि रामदास कदमांच्या वादावर बोलताना अनिल परब यांनी दोन्हीही ज्येष्ठ नेत्यांना दिवाळी सोबतच पुढील भांडणांसाठी शुभेच्छा देत टोला लगावला. तसेच आम्ही यांना गद्दार म्हटलं की राग येतो, पण आता तेच एकमेकांचा बायोडेटा वाचून दाखवतायत. शिवसेनेत असताना यांनी काय काय केले ते लोकांसमोर आणतातय, हे दोघेही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असल्याचेही अनिल परब यांनी यावेळी अधोरेखीत केले.

हे ही वाचा :Gautam Singhania : रेमंडचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांचा पत्नीशी काडीमोड

अनिल परब पुढे म्हणाले की, जे बाळासाहेबांच्या विचारांचा दाखले देतायत, त्यांची ही प्रकरणे बाळासाहेब ह्यात असतानाची आहेत. त्यामुळे बाळासाहेब असताना ह्यांची निष्ठा किती मजबूत होती, याचे दाखले ते देतायत. त्यामुळे बाळासाहेब जीवंत असताना यांनी काय काय केले आहे, हे आता तमाम शिवसैनिकांना कळाल्याचे अनिल परब यांनी सांगितले. तसेच रामदास कदम गजाभाऊच्या निष्ठेचे पाढे वाचतायत आणि पण कोणी कोणाला कसं पाडलं, हे आम्हाला सगळं माहिती आहे, असे देखील अनिल परब म्हणाले.

या वादात गजाभाऊंनी प्रेसनोट काढून रामदार कदमांवर आणखीणच गंभीर आरोप केले होते. गजाभाऊंच्या या आरोपावर बोलताना अनिल परब म्हणाले, या गोष्टी आम्हाला माहितीच आहेत. पण गजाभाऊंनी प्रसिद्धी पत्रक काढून अख्ख्या महाराष्ट्राला सांगितलं. तसेच हे उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत नव्हे तर बाळासाहेबांच्या वेळेस हे घडलं असल्याचेही परब म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp