‘लफंगा, बदमाश, निर्लज्ज’; संजय राऊतांचा तोल सुटला, नार्वेकरांना डिवचलं

मुंबई तक

राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 54 आमदारांचा निर्णय घेऊ असं म्हणत अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाच्या आमदारांवरही अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे संकेत दिले. त्यावरून संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली.

ADVERTISEMENT

sanjay raut on mla disqualification, says rahul narvekar should take decision as soon as possible
sanjay raut on mla disqualification, says rahul narvekar should take decision as soon as possible
social share
google news

sanjay raut on mla disqualification : 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांचा बोलताना संयम सुटला. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 54 आमदारांचा निर्णय घेऊ असं म्हणत अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाच्या आमदारांवरही अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे संकेत दिले. त्यावरून संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेची तोफ डागली.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “हुकुमशाहीचा पराभव सामन्य जनता करू शकते, हे पुन्हा एकदा दिसून आलं. जे 1978 साली इंदिरा गांधींच्या बाबतीत झालं होतं, त्याची सुरूवात कर्नाटकपासून सुरू झाली आहे. त्याच्यामुळे कर्नाटक तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, पेक्षा कर्नाटक तो झांकी है पूरा देश अभी बाकी है. आम्ही 2024 ची तयारी करतोय.”

हेही वाचा >> Sunil Kanugolu : काँग्रेसला दिलं कर्नाटक जिंकून! कोण आहेत कानुगोलू?

“महाराष्ट्र हे तर भाजपने लुटलेलं राज्य आहे. ही लूट आहे. ही काही नैतिकता नाही. त्यामुळे लुटीचं राज्य त्यांच्याकडे फार टिकणार नाही. आजचं मी बघितलं की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लंडनमधून मुलाखत देताहेत की, शिवसेनेचे उर्वरित 16 आमदार कसे अपात्र होतील. याविषयी तिकडे प्रवचनं करत आहेत”, असं राऊत म्हणाले.

राहुल नार्वेकरांना पक्षांतराचा छंद, संजय राऊत काय बोलले?

राहुल नार्वेकरांनी केलेल्या विधानावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, “हे जे नार्वेकर आहेत, त्यांच्या पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे आणि पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. पक्षांतरावर उत्तेजन देणं, हा त्यांचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही. आम्ही फक्त सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचं पालन करायला सांगतो आहोत. नाहीतर महाराष्ट्र काय आहे, हे आम्हाला दाखवावं लागेल, ही धमकी नाहीये. परत म्हणतील आम्हाला धमकी दिली.”

हे वाचलं का?

    follow whatsapp