Maharashtra Karnataka Border Dispute : ‘तुमचं सरकार गेलं खड्ड्यात, ताबडतोब…’, संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात

मुंबई तक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केल्यानं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न चिघळला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव निर्माण झाला असून, विरोधकांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह दिल्लीतील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. खासदार संजय राऊतांनीही या वादामागे केंद्रातील मोदी सरकार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या अस्मितेचं, महाराष्ट्राच्या सार्वजनिक मालमत्तेचं, महाराष्ट्राच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केल्यानं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न चिघळला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव निर्माण झाला असून, विरोधकांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह दिल्लीतील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. खासदार संजय राऊतांनीही या वादामागे केंद्रातील मोदी सरकार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या अस्मितेचं, महाराष्ट्राच्या सार्वजनिक मालमत्तेचं, महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. या सरकारला एक दिवसही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे”, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर केली.

कर्नाटकच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन; आता विषय अमित शाहंच्या कानावर टाकणार : फडणवीस

“ज्या पद्धतीने 24 तासांपासून सीमाभागात सरकारी प्रेरणेनं, कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होतेय, हल्ले होताहेत आणि प्रतिकार करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांना तुरुंगात डांबलं जात आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही?”, असा सवाल करत संजय राऊतांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp