मंत्रिमंडळ विस्तार : संजय शिरसाट, बच्चू कडूंची नाराजी पुढच्या पंधरा दिवसात दूर होणार?

मुंबई तक

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-भाजप सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे दसऱ्यापूर्वी होणार असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, नव्या मंत्र्यांच्या नावांवर चर्चा होऊन ती अंतिम करण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या संजय शिरसाट, बच्चू कडू या आमदारांची नाराजी दूर होण्याची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-भाजप सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे दसऱ्यापूर्वी होणार असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, नव्या मंत्र्यांच्या नावांवर चर्चा होऊन ती अंतिम करण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या संजय शिरसाट, बच्चू कडू या आमदारांची नाराजी दूर होण्याची आशा आहे.

शिंदे गट – अपक्षांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार आटोपण्यात आला. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचा पत्ता कट झाला.

शिंदे गटातील अनेक जण मंत्रिमंडळात संधी मिळणार, यामुळे आनंदात होते. मात्र, ऐनवेळी त्यांना बाहेरच राहावं लागलं. दुसरीकडे शिंदे गटासोबत गेलेल्या अपक्षांनाही मंत्रिपदाची आस होती. पण, भाजप आणि शिंदे गटाने अपक्षांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं नाही.

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं आमदार नाराज असल्याची चर्चा सातत्यानं होत आहे. संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यासह काहींनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तार हा शिंदे-फडणवीसांठी कसरतीचा ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp